अंगणवाडी केंद्र हे भारत सरकारच्या एकीकृत बाल विकास सेवा योजना (ICDS – Integrated Child Development Services) अंतर्गत चालवले जाणारे एक महत्त्वाचे उपक्रम केंद्र आहे. या केंद्राचा मुख्य उद्देश लहान मुलांचा सर्वांगीण विकास, महिलांचे आरोग्य व पोषण, आणि शालेय पूर्व शिक्षण या बाबींवर लक्ष केंद्रित करणे हा आहे.
हर घर तिरंगा – खरोली गाव
आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत खरोली ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.